New Rules From July : मित्रांनो लवकरच जुलै महिना सुरू होत आहे आणि नव्या महिन्यासोबतच काही महत्त्वाचे सरकारी आणि वित्तीय नियम बदलले जात आहेत. हे बदल बँकिंग, रेल्वे, गॅस दर, क्रेडिट कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या तुमच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, म्हणजेच आर्थिक खर्चावर होण्याची शक्यता आहे.
रेल्वे तिकिटांचे दर वाढणार
१ जुलैपासून रेल्वे प्रवासासाठी अधिक भाडं द्यावं लागणार आहे. नॉन-एसी कोचचं भाडे प्रति किलोमीटर १ पैसे आणि एसी कोचचं भाडे प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढणार आहे. ही दरवाढ मोठ्या प्रमाणात नसली, तरी नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी खर्चात थोडी वाढ होणार आहे.
सरकारकडून मोफत भांडी संच मिळविण्यासाठी असा करा अर्ज
गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार
जुलै महिन्यात व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला दर अपडेट करतात. १ जुलै रोजी व्यावसायिक गॅसचे, तर ७ जुलै रोजी घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅसवरील खर्च वाढू किंवा कमी होऊ शकतो.
ATM व्यवहार महाग होणार
१ जुलैपासून ATM वापराबाबतचे नियमही बदलणार आहेत. ग्राहकांना दर महिन्याला केवळ ३ वेळा मोफत रोख व्यवहार करता येतील. त्यानंतर प्रत्येक रोख व्यवहारासाठी २३ रुपये आणि नॉन-फायनान्शियल व्यवहारासाठी ८.५० रुपये शुल्क आकारले जाईल. त्यामुळे ATM वापरताना अधिक खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.
या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये , पहा सविस्तर माहिती
HDFC क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये बदल
१ जुलैपासून HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डशी संबंधित काही नियम बदलले जात आहेत. जर ग्राहकांनी थर्ड पार्टी अॅपद्वारे क्रेडिट कार्ड बिलाचे पेमेंट केले, तर त्यावर १% शुल्क लागणार आहे. याशिवाय, युटिलिटी बिल पेमेंटवरही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
पॅन कार्डसाठी आधार लिंक अनिवार्य
१ जुलैपासून पॅन कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे आधीच पॅन आणि आधार दोन्ही आहेत, त्यांनी ते ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी लिंक करणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांचे पॅन निष्क्रिय ठरू शकते.
पीएम आवास योजना ग्रामीण : पीएम आवास ग्रामीण योजनेची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा
हे सर्व बदल १ जुलैपासून लागू होणार असून त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. त्यामुळे वेळेत या बदलांची माहिती घेऊन त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनावश्यक आर्थिक ताण टाळता येईल.