CLOSE AD

हवामान अंदाज : पुढील 4 दिवस काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Yellow Orange Alart : मित्रांनो राज्यात २८ जूनपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २७ ते ३० जून दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

पीएम आवास योजना ग्रामीण : पीएम आवास ग्रामीण योजनेची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा

नागपूरात मुसळधार पाऊस पूरसदृश परिस्थिती

बुधवारी रात्री नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. हसनबाग रोड, नंदनवन कॉलनी आणि परिसरातील रस्त्यांवर सुमारे एक फूट पाणी साचले होते. सिमेंट रस्त्यांचे उंचावलेले स्तर आणि अपुरी नालेव्यवस्था यामुळे पाणी घरात घुसले. परिणामी, अनेक कुटुंबांना रात्री जागून काढावी लागली. या कालावधीत नागपुरात ८.८ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय, २९ जूनपर्यंत अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक विभागात यलो अलर्ट

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये गेल्या काही तासांपासून रिमझिम स्वरुपाचा पाऊस सुरू असून, घाटमाथ्यांवरील भागात ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग कमी झाल्याने गोदावरी नदीची पातळी काहीशी खाली आली आहे.

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना मिळणार या तारखेला पुढील हप्ता , नवीन यादी जाहीर

पश्चिम महाराष्ट्र – घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

पुणे शहरात पुढील चार दिवस सौम्य स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर परिसरातील घाटमाथ्यांवर अतिवृष्टी होण्याचा धोका आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची स्थिती

मराठवाड्यात काही भागांत हलकासा, तर काही भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अद्यापही पावसाअभावी सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सरकारतर्फे 100 शेळ्या आणि 5 बोकड घेण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज

राज्यात अनेक भागांत आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.

Leave a Comment