CLOSE AD

1 गुंठा जमिनीची खरेदी विक्री करता येणार ! जाणून घ्या सविस्तर माहिती

Land Buy Sell : मंडळी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक आनंददायक बातमी आहे – आता १ गुंठा जमीन खरेदी करता येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तुकडाबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींना दिलासा मिळणार आहे.

पावसाळी अधिवेशनात नवीन कायदा मंजुरीसाठी

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात १ गुंठा जमीन खरेदीस परवानगी देणारा कायदा मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

पीएम आवास योजना ग्रामीण : पीएम आवास ग्रामीण योजनेची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा

शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा

आजपर्यंत अनेक नागरिकांना अल्प प्रमाणात, म्हणजे १ गुंठा किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन खरेदी करायची असली तरीही, तुकडाबंदी कायद्यामुळे ती खरेदी शक्य होत नव्हती. मात्र नवीन कायद्यामुळे आता रहिवासी क्षेत्रात १ गुंठ्याचे तुकडे अधिकृतरित्या खरेदी-विक्रीस खुले होतील.

काय आहे तुकडाबंदी कायदा ?

१९४७ मध्ये लागू करण्यात आलेल्या या कायद्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आले. या प्रमाणात कोणतीही जमीन तुकड्यात विक्री करता येत नव्हती. परिणामी, अल्प क्षेत्रफळ खरेदी करायचं असणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतजमिनीच्या वाटपात किंवा खरेदी-विक्री व्यवहारात अडथळे निर्माण होत होते.

लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना मिळणार या तारखेला पुढील हप्ता , नवीन यादी जाहीर

२०१७ नंतर सुधारणा आणि नवीन निर्णय

२०१७ मध्ये कायद्यात सुधारणा करून, १९६५ ते २०२७ या कालावधीत झालेल्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजारमूल्याच्या २५% रकमेची अट ठेवण्यात आली होती. मात्र ती रक्कम अधिक असल्यामुळे अनेक लोकांनी त्यात सहभाग घेतला नाही.

नंतर ही मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आणि अट सुलभ करत २५% ऐवजी केवळ ५% भरून व्यवहार नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यपालांच्या संमतीने यासंबंधी अध्यादेशही जारी करण्यात आला.

सरकारतर्फे 100 शेळ्या आणि 5 बोकड घेण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज

कायदा दोन्ही सभागृहात मंजूर

हा अध्यादेश विधेयकाच्या स्वरूपात विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे तुकडाबंदी कायद्यातील सुधारणा आता अधिकृतपणे लागू होणार आहे.

एकंदरीत १ गुंठा जमीन खरेदीस परवानगी मिळाल्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हा निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Comment