CLOSE AD

हवामान अंदाज : येत्या 48 तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

High Rain Alert in 48 hours : मंडळी जून अखेरीस मोसमी पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला असून, आता राज्यभर पावसाच्या सरी बरसत आहेत. सुरुवातीला मोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली होती. मात्र रात्रीपासून विदर्भात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये …. जाणून घ्या सविस्तर माहिती

पावसाचा प्रभाव

कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाला सुरुवात झाली होती. त्याचवेळी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पावसाने उशीर केला. रात्रीपासून मात्र या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मेहकर आणि लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला. वाशिम आणि अकोला जिल्ह्यांतही पावसाचा जोर दिसून आला. वर्धा जिल्ह्यात मोसमी पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये दुर्दैवाने दोन बळी गेले. अनेक शेतकऱ्यांची पेरणी पाण्याने वाहून गेली असून हंगामाच्या सुरुवातीलाच नुकसान झाले आहे.

सरकारकडून मोफत घर मिळविण्यासाठी असा करा त्वरित अर्ज Free Gharkul Yojana

हवामानाचा अंदाज

हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई व उपनगरांत २८ जून रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह इतर उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलर्ट व इशारे

२८ ते ३० जूनदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. येथे वादळी वारे, विजांचा कडकडाट व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.

1 जुलैपासून हे नियम बदलणार , जाणून घ्या सविस्तर माहिती

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत यलो अलर्ट असून पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांसाठीही अति मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment