Heavy Rain Alert Districts : मित्रांनो महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यांसाठी महापुराचा रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये , असा करा अर्ज
मुंबई व उपनगरात थोडा ब्रेक, पण ठाणे व तळकोकणात पावसाचा मारा कायम
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड आणि तळकोकणात पावसाचा जोर कायम आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे या भागांमध्ये महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
२६ ते २९ जून कोकण व नाशिक घाटात अतिवृष्टीचा इशारा
२६ ते २९ जूनदरम्यान ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या घाट परिसरात विशेषता आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर मैदानी भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी , पहा सविस्तर माहिती
मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, आज काही भागांत पावसाची शक्यता असली तरी पुढील दोन दिवस तुलनेने कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा-विदर्भात विजांचा कडकडाट आणि सरींचा इशारा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये तुरळक सरी पडतील.
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरींचा इशारा देण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींना स्वतःची पतसंस्था सुरु करण्याची संधी
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर
पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि नदीकाठच्या परिसरापासून दूर राहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सूचना — नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षपूर्वक ऐकाव्यात आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.