Edible Oil Rate Today : मित्रांनो देशभरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या महागाईमुळे सामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडले होते. विशेषता रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे घरखर्चावर मोठा ताण येत होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे – खाद्यतेलाच्या आयातीवर लागणारे शुल्क कमी करण्याचा.
याअंतर्गत खाद्यतेलावर लावण्यात येणारे आयात शुल्क २०% वरून थेट १०% करण्यात आले आहे. म्हणजेच, या करात ५०% घट झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे बाजारात तेलाचे दर कमी होतील आणि ग्राहकांना स्वस्त दरात खाद्यतेल उपलब्ध होईल.
श्रीमंत करणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या 4 बेस्ट स्कीम , जाणून घ्या सविस्तर माहिती
सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरचा आर्थिक ताण हलका होईल. उदाहरणार्थ एखादे कुटुंब दर महिन्याला सुमारे २ लिटर तेलाचा वापर करत असेल, तर त्यांना ५० ते १०० रुपयांची बचत होऊ शकते.
हा निर्णय केवळ ग्राहकांपुरता मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. विशेषता तेलबिया पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आयातीवरील कर कमी झाल्यामुळे देशांतर्गत उत्पादनावरचा दबाव कमी होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे अधिक चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.
ही पावले सरकारच्या महागाई नियंत्रण कार्यक्रमाचा एक भाग आहेत. अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर वाढत असताना, सरकारने खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
SBI बँकेतून १० लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास किती EMI भरावा लागेल ?
जगभरातील तेलाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असतात. त्यामुळे भारत सरकारने लवचिकता दाखवत वेळेवर योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात दर स्थिर राहतील आणि पुरवठाही सुरळीत होईल.
खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्यानुसार, आयात सुलभ झाल्याने पुरवठा वाढेल आणि ग्राहकांना तेल स्वस्त मिळेल.
सरकारने यासारखे निर्णय भविष्यातही घेण्याचे संकेत दिले आहेत. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर आणखी कमी झाले, तर त्याचा लाभ देशातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील टप्प्यातही दर कमी करण्यात येतील. तसेच इतर वस्तूंवरील दर नियंत्रित ठेवण्यासाठीही असेच उपाय राबवले जातील.
बापरे ! जुलै महिन्यात बँकेला एवढ्या दिवस सुट्ट्या , पहा सविस्तर माहिती
मित्रानो एकंदरीत हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. स्वयंपाकाच्या खर्चात घट होईल, मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक सवलत मिळेल आणि येत्या काही आठवड्यांमध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील.